Arts, Science & Commerce College, Vinchur - Dalvi

Arts, Science & Commerce College, Vinchur - Dalvi Arts, Science & Commerce College, Vinchur - Dalvi

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे न्यू इंग्लीश स्कूल व ज्यू कॉलेज, कवडद...
05/03/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे न्यू इंग्लीश स्कूल व ज्यू कॉलेज, कवडदरा येथे ‘स्कूल कनेक्ट २.०’ अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विंचूर दळवी महाविद्यालयातर्फे कवडदरा ज्यू. कॉलेज ला एक बेलाचे रोप भेट देण्यात आले. शाळेने तत्काळ वृक्षारोपण करून विंचूर दळवी महाविद्यालयाची भेट सहृदय स्वीकृत केल्याचे दाखवले. प्रा. एस. ए. घेगडमल, प्रा. एस. बी. भारुटे, प्रा. जे. आर. बऱ्हे, प्रा. एच एस. लहारे व प्रा. ए. बी. अवचारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. ए. बी. अवचारे यांनी ‘राष्टीय शैक्षणिक धोरण’ म्हणजे नेमकं काय यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. जुने शैक्षणिक धोरण व नवीन शैक्षणिक धोरणातील फरक त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून देऊन नवीन शैक्षणिक धोरणाने देशात अमुलाग्र बदल होणार असल्याचे सांगितले.
प्रा. एस. ए. घेगडमल यांनी कला शाखेतील, प्रा. एस. बी. भारुटे यांनी वाणिज्य शाखेतील व प्रा. जे. आर. बऱ्हे यांनी विज्ञान विभागात झालेल्या बदलांबाबत भाष्य केले. व विद्यार्थ्यांनी उपस्थीत केलेल्या शंकांचे निराकरणही त्यांनी केले.
.0 #शैक्षणिककार्यशाळा #विद्यार्थीमार्गदर्शन #राष्ट्रीयशैक्षणिकधोरण #वृक्षारोपण #शिक्षणसमृद्धी #ज्ञानसंपन्नता #विद्यार्थीविकास

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महा...
20/02/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. अनिल अवचारे यांनी प्राध्यापक मनोगत व्यक्त करताना शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंच्याही बायका सुरक्षित होत्या व आजच्या काळात स्वतःच्या मुलीही असुरक्षित असल्याची खंत व्यक्त केली. भारतात अनेक राजांनी महाल बांधून त्यात बायका नाचवल्या. परंतु शिवाजी महाराजांनी 365 गड किल्ले बांधून माता भगिनी सुरक्षित केल्यात. आजची पिढी शिवाजी महाराजांना फक्त डोक्यावर घेऊन नाचते व बॅनरच्या माध्यमातून शिवाजी महाराजांप्रति प्रेम दाखवते. परंतु शिवाजी महाराजांचे विचार पुस्तकातून मस्तकात टाकून ते प्रत्यक्षात आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. बॅनर छापण्यावर कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तो खर्च केला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल. तसेच "शिवाजी महाराज" या मंत्राची रोज एक माळ जपल्याने समस्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाण्याची शक्ती अंगात संचारत असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. प्रा. एस. डी. गंगावणे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास एका दिवसात सांगण्यासारखा नाही असे सांगत संतश्रेष्ठ तुकारामांचा ३४२०वा अभंग "काय दिला देगा देवा आम्हा विठ्ठलची व्हावा" वर प्रवचन केले. त्यात त्यांनी शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्या भेटीचे वर्णन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. महाले सरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील संत तुकारामांचे महत्त्व विशद करून शिवाजी महाराजांच्या शक्तीला संत तुकारामांनी भक्तीचे अधिष्ठान दिल्याचे सांगितले. नैतिकतेचे अधिष्ठान नसेल तर राजा नामशेष होतो व शिवाजी महाराजांसारखी नैतिकता अंगी असेल तर राजा अजरामर होतो. संत तुकोबांकडे पाहून शिवाजीराजांकडे विरक्ती व सहनशीलतेचे गुण आले. शिवाजी महाराजांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते संत तुकोबांच्या कीर्तनाला बसत असत. तसेच संत रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीची मंदिरे बांधून बलाची साधना करण्यास सांगून स्वराज्यासाठी मावळे तयार करण्याचे काम केले. मावळ्यांमध्ये स्वामी सेवा व नैतिकतेचे बळ संत तुकोबारायांनी आणले आणि त्यामुळेच प्राणांची आहुती देणारे मावळे स्वराज्यासाठी मिळणं शक्य झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. आर. निर्मळ, प्रस्ताविक एस. ए. थोरात व आभार प्रदर्शन प्रा. एस. बी. भारुटे यांनी केले.
#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #स्वराज्य #मराठासम्राट #शौर्य #गौरवशालीइतिहास #मनाचामुजरा

महात्मा गांधी विद्यामंदिरच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याची परिपूर्ती करणे व भाऊसाहेब हिरे  यांची शिक्षणाच...
17/02/2025

महात्मा गांधी विद्यामंदिरच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याची परिपूर्ती करणे व भाऊसाहेब हिरे यांची शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्याची विचारधारा समोर ठेऊन शिवजयंती, मराठी भाषा दिन तसेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थांचा सर्वागीण विकास व्हावा, त्यांना वैचारिक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या मनात वैचारिक क्रांती घडवून ही तरुण पिढी राष्ट्र उभारणीसाठी समर्पित करण्याचा अंशतः प्रयत्न आम्ही या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने करीत आहोत.
#शिवजयंती #मराठीभाषादिन #वक्तृत्वस्पर्धा #लेखनस्पर्धा #तालुकास्तरीय #

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा ...
11/02/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने सांस्कृतिक विभागातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसिध्द लावणी सम्राट अमोलजी गोडसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते. याप्रसंगी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख असणारी लावणी व अध्यात्माचा वारसा जपणारा अभंग हे दोन वेगवेगळे कलाविष्कार एकाच स्टेजवर सादरीकरणाची कीमायादेखील उपस्थितांना अनुभवायला मिळाली. लावणी सम्राट अमोल गोडसे यांनी लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. महाले सरांनी अभंग गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच प्रा. अनिल अवचारे यांनी गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. महाले सर, प्रा. एस. ए. घेगडमल, प्रा. बी. एस. सपकाळे व प्रा. जे. आर. बऱ्हे हे व्यासपीठावर उपस्थीत होते. अथर्व महाले, रवी बोराडे, योगेश्वरी चौधरी, वैजू सोनोवणे, अनुष्का गायकवाड, विद्या कडवे, आश्लेषा येडे, गायत्री भास्कर, पूजा गायकवाड, गौरी चौबे, श्रद्धा चौबे, श्यामली वाघ, अवनी अभंग, ऋषिकेश गांगुर्डे, सागर डावखर, साक्षी उगलमुगले या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य तसेच एकांकिका यांसारखे कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रा. अनिल अवचारे यांनी विद्यार्थ्यांची रंगीत तालीम करून घेतली.
प्रा. एम. व्ही. रीपोटे व प्रा. अनिल अवचारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. एस. ए. घेगडमल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय...
06/02/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्प संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. महाले सर हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रा. राजाराम मुंगसे यांनी 'रसास्वाद' या विषयावर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या विनोदी शैलीत शृंगार रस, करुण रस, वीर रस, हास्य रस, बीभत्स रस, रौद्र रस, भयानक रस, अद्भुत रस व शांत रस या नवरसांचे वर्णन काव्य, पोवाडा, अभंग व चित्रपटातील काही संवादांच्या माध्यमातून विषद करून ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकून घेतली. मृत्युनंतर स्वर्ग बघण्यापेक्षा आपण हयात असतानाच या नवरसांचा आस्वाद घेऊन स्वर्गाची अनुभूती घेऊ शकतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तुम्ही आता कुटुंब प्रमुख नसून त्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आहात हा विचार करून नवरसांच्या माध्यमातून कुटुंबाशी व समाजाशी जुळवून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. आर. बऱ्हे मॅडम, प्रमुख अतिथी परिचय प्रा. एस. डी. गंगावणे सर व आभार प्रदर्शन प्रा. आर. आर. निर्मळ सरांनी केले.
सदर कार्यक्रमात प्रा. आर. आर. निर्मळ, मोठ्या संख्येने परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#ज्येष्ठनागरिकव्याख्यान #रसास्वाद

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय...
06/02/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प संपन्न झाले. द्वितीय पुष्पा प्रसंगी प्रा. विजयकुमार कर्नाटकी यांनी 'सुखी जीवनाचे मूलमंत्र' या विषयावर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. महाले सर, श्री. दादासाहेब देशमुख व श्री. आर. एन. चव्हाण सर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एक पुस्तक व बेलाचे रोप देऊन मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. उतार वयात 'निरोगी असणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सुखी असणं' आहे. वृद्धापकाळात बरेचसे त्रास असतात. या त्रासांमागील कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्रासाकडे बघण्याची मानसिकता वृद्धांनी बदलायला हवी. त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेणं गरजेचं आहे. वृद्धापकाळात एकटेपणा ही सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक समस्या असून दिसते. त्यासाठी वृद्धांनी छंद जपायला हवेत. आपल्या आयुष्यभराच्या अनुभवाचा वापर जनरेशन गॅप भरून काढण्यासाठी वृद्धांनी करावा असे आवाहन यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल अवचारे, प्रस्ताविक प्रा. एस. ए. घेगडमल, आभार प्रदर्शन प्रा. एच. एस. लहारे यांनी केले.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या बहिःशान विभागाचे कार्यावाह प्रा. आर. आर. निर्मळ, श्री. नारायण आडके, श्री. आर. एन. चव्हाण सर, व मोठ्या संख्येने भगूर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#ज्येष्ठनागरिकव्याख्यान #सुखीजीवनाचेमूलमंत्र

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण...
29/01/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. महाले सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर प्राचार्य महाले सरांनी भारतीय संविधानाचे महत्व व वैशिष्ट्ये विषद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. आर. निर्मळ तसेच आभार प्रदर्शन प्रा. जे. आर. बऱ्हे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय...
25/01/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प संपन्न झाले.
प्रथम पुष्पा प्रसंगी डॉ. शामकुमार दुसाने यांनी 'आरोग्यावर बोलू काही' या विषयावर मार्गदर्शन केले.
मानवी शरीर ही 540 कोटींची संपत्ती आहे. जीवन अनमोल आहे. निरोगी शरीरासाठी निरोगी मनाची आवश्यकता आहे. माणसाने आयुष्यभर शिकले पाहिजे व ज्येष्ठ नागरिकांनी मुक्त विद्यापीठाचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी आदर्श जीवनपद्धती महत्त्वाची असल्याचेही पुढे त्यांनी सांगितले.
प्राचार्य महाले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून निरोगी शरीर हीच आपली खरी संपत्ती असल्याचे सांगितले. आरोग्याकडे ज्येष्ठांनी लक्ष दिल्यास घरातले लहानगे स्वतःहूनच त्यांचे आचरण करतील व एका सुदृढ सशक्त व निरोगी भारताची उभारणी आपल्याला करता येईल. ज्येष्ठ नागरिक हे चालतं बोलतं विद्यापीठ असून ते देशाचा महत्त्वाचा स्तंभ आहेत. समाजाला योग्य दिशा देण्याचं काम ज्येष्ठांचा अनुभव करत असल्याचेही पुढे त्यांनी सांगितले.
बहिःशाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. आर. आर. निर्मळ यांनी प्रस्ताविकेतून या व्याख्यानमालेची उद्दिष्टे व महत्त्व या वर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. व्ही. रिपोटे मॅडम, प्रमुख अतिथी परिचय प्रा. एस. बी. भारुटे सर व आभार प्रदर्शन बी. एस. सपकाळे सरांनी केले.
सदर कार्यक्रमात भगूर ज्येष्ठ नागरिक संघ चे अध्यक्ष श्री दादासाहेब देशमुख, श्री नारायण आडके, श्री सदाशिव सांबरे, व मोठ्या संख्येने भगूर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#संतगाडगेबाबाव्याख्यानमाला #आरोग्य #शिक्षण #अनमोलजीवन #सुदृढभारत #समाजसंपदा

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युव...
13/01/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिन साजरा करण्यात आला. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी श्री. पुंडलिक पिंपळके सर प्रमुख वक्ते म्हणून लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पिंपळके सरांनी स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना भविष्यात काय होणार असे विचारल्यावर त्यांनी गमतीने ड्रायव्हर होणार असल्याचे सांगितले. आणि मोठे झाल्यावर ते अध्यात्माचे ड्रायव्हर होऊन त्यांनी संपूर्ण जगाला अध्यात्माचा परिचय करून दिला. विद्यार्थीदशेत असताना ते शिक्षकांना सुद्धा विचार करायला भाग पाडणारे प्रश्न विचारायचे. परंतु आजच्या तरुण पिढीला विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणातील "माझ्या प्रिय भगिनी आणि बंधुंनो.." या व्यतिरिक्त इतर काहीही माहिती नसल्याची खंत पिंपळके सरांनी व्यक्त केली. जगातील सर्व विद्वान एका पारड्यात ठेवले आणि स्वामी विवेकानंदांना दुसऱ्या पारड्यात ठेवले तरी स्वामी विवेकानंदांची विद्वत्ताच जास्त मोजली जाईल असे त्यांनी पुढे सांगितले. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून शिकवण घेऊन उंच भरारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य एस. डी. महाले सरांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले. आई जिजाऊ ह्या शिवरायांसाठी प्रेरणास्थान होत्या. शिवरायांनी मातेचे ऐकले म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले परंतु आज च्या तरुणाईची आई वडिलांशी असलेली नाळ कुठेतरी कमकुवत होत असल्याची खंत त्यांनी पुढे व्यक्त केली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ कडून प्रेरणा घेऊन तरुणांनी देश बांधणीत स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. व्ही. रिपोटे मॅडम, प्रास्ताविक प्रा. एस. ए. घेगडमल सर, प्रमुख अतिथी परिचय प्रा. अनिल अवचारे व आभार प्रदर्शन आर. आर. निर्मळ यांनी केले.
याप्रसंगी प्रा. जे. आर. बऱ्हे, प्रा. एम. व्ही. रिपोटे, यांच्या समवेत सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#जयंती #माँसाहेब #राजमाताजिजाऊ #स्वामीविवेकानंद #विनम्रअभिवादन

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळा च्या वतीने भारतीय भाषा उ...
12/12/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळा च्या वतीने भारतीय भाषा उत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. महाले सर व प्रा. एस. के. बलक हे व्यासपीठावर उपस्थीत होते. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख प्रा. ए. बी अवचारे यांनी ‘भाषा व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकासात भाषेला सर्वाधिक महत्व असल्याचे सांगितले. सर्वांना बोलता येते; पण प्रभावीपणे बोलता येणे ही कला आहे. आणि ही कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवी. बोलण्यातून माणसाची गुणवत्ता झळकते. आपण स्वतः ला असं विकसित करावं की, आपलं बोलणं प्रत्येक ठिकाणी चालायला पाहिजे व आपलं चालणं बोलायला पाहिजे. ‘थॅंक यु’ आणि ‘सॉरी’ हे फक्त शब्द नाहीत तर ती शस्त्रं आहेत व या शस्त्रांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. वाणीला वीणा बनवल्यास आपलं रागावण्याचासुद्धा लोक आनंद घेतात. निरीक्षणाने संवाद कौशल्यात प्रवीण होता येत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एस. डी. महाले सरांनी भारतात जवळपास १६०० वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असल्याचे सांगितले. व प्रत्येक भाषेला सौंदर्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली व गीतेमध्ये आधुनिक युगाच्या सर्व समस्यांची उत्तरे असल्याचेही त्यांनी सांगितले. हीच गीता लिखित भाषेच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचली. सोशल मिडीयाने आपल्या भाषेला बेशिस्त बनवल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. लिखाण व वाचनाने भाषा समृध्द करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. व्ही. रीपोटे व फलकलेखन प्रा. एस. ए. घेगडमल यांनी केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य विंचूर दळवी महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी ...
06/12/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य विंचूर दळवी महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी काळे ओमकार महेंद्र या विद्यार्थ्याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तर्फे घेतल्या जाणाऱ्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

नाशिक विभागामार्फत एम. जे. एम महाविद्यालय, करंजाळी येथे नुकत्याच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पार पडल्या. त्यात ओमकार काळे याने कुस्ती (ग्रीको) या क्रीडा प्रकारात ६० किलो वजनी गटातून आपला सहभाग नोंदवला. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने निवड समितीचे लक्ष्य वेधून घेतले.

सदर विद्यार्थ्याला स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे, संस्थेचे समन्वयक मा. आ. डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. महाले सर यांनी शुभेच्छा दिल्या.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विंचूर दळवी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे अंतर्गत गु...
04/12/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विंचूर दळवी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०६/१२/२०२४ ते १०/१२/२०२४ दरम्यान "शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारपुष्प व्याख्यानमाला" वर्ष पहिले हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. भीमराव आंबेडकर यांचे विचार पुस्तकातून तरुणांच्या मस्तकात टाकून तरुणांना सशक्त करण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.

Address

Arts , Science & Commerce College, Vinchur/Dalvi, Sinnar Nashik
Sinnar
422502

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5am
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts, Science & Commerce College, Vinchur - Dalvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share